सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणुकींची गती वाढली; २९ महापालिका आणि १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता
Maharashtra Municipal Elections 2025 : महत्त्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक असल्याने, राज्य निवडणूक आयोगाने तयारीचा वेग वाढवला आहे.

ही अंतिम मुदत लक्षात घेता, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, असा अंदाज निवडणूक आयोगाच्या हालचालींवरून दिसत आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
महापालिका निवडणुकीची घोषणा कधी?
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन रविवारी संपणार आहे. अधिवेशनानंतर लगेचच पुढील आठवड्यात महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते.
सर्व प्रक्रिया आधीच अंतिम टप्प्यात आहेत आणि वेळ वाचवण्यासाठी आयोग तातडीने निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
मतदार याद्या वेगात
मतदार यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी १० डिसेंबर २०२५ पर्यंत प्रसिद्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
यादी जाहीर झाली की निवडणुकांचा कार्यक्रम कधीही समोर येऊ शकतो.
१२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही एकत्रित?
महापालिकांसोबतच ग्रामीण भागातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रित घेण्याचा पर्याय आयोग विचारात घेत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ५० टक्के आरक्षण लागू ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील २० जिल्हा परिषदांची निवडणूक सध्या शक्य नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोणत्या जिल्हा परिषदांना परवानगी?
न्यायालयाने खालील जिल्ह्यांसाठी निवडणुकीची मुभा दिली आहे –
लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
याचबरोबर या १२ जिल्ह्यांतील १२५ पंचायत समित्याही यामध्ये समाविष्ट आहेत.
महापालिका निवडणुकांच्या कार्यक्रमासोबतच जिल्हा परिषदांचा कार्यक्रमही जाहीर होऊ शकतो.
तथापि, मतदानाच्या तारखा स्वतंत्र असण्याची शक्यता आहे.
अंतिम निर्णय प्रतीक्षेत
जिल्हा परिषदांच्या निवडणुका जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली होतात, तर पालिका निवडणुका आयुक्तांकडे असतात.
दोन्ही निवडणुकांसाठी मनुष्यबळ, पोलीस यंत्रणा आणि प्रशासनिक तयारी यांचा आढावा घेत आहे.
पुढील दोन-चार दिवसांत दोन्ही निवडणुका एकत्रित घेण्याबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकतो.