केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा कृषी आणि पर्यायी इंधन क्षेत्राला चालना देणारा मोठा संदेश; भविष्यात बांबूला उसाच्या तोडीचा भाव मिळू शकतो.
पुणे | भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा 22-24 टक्क्यांच्या दरम्यान असून, कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होऊ शकत नाही, असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. ते सोमवारी पुण्यात प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने आयोजित ‘बायोहॉर्स’ कार्यक्रमात बोलत होते.
- Weather Alert: या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता ; 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Central Government Alert केंद्रा कडून ; सर्व राज्यांना पत्र 20 दिवसांत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश
- ZP Election जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर ; कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?
- Weight Lose सकाळी करा ही ५ कामे; पोटाची चरबी कमी होईल
- Nano Banana AI वापरून काही मिनिटांत 3D फोटो कसा बनवायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

गडकरी म्हणाले, “देशात दरवर्षी तब्बल 22 लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात केले जाते. यापैकी 40 टक्के प्रदूषण हे वाहनांमुळे होते. लोकसंख्या आणि वाहनांची वाढ लक्षात घेता प्रदूषणाचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. पर्यायी इंधनाचा वापर पर्यावरण आणि आरोग्य या दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, इथेनॉल उत्पादनामुळे मक्याचे उत्पादन आणि उत्पादकांचे उत्पन्न वाढले आहे. टाकाऊ शेतमालापासून बायो-CNG निर्मिती होत असून, त्यामुळे टाकाऊ मालालाही किंमत मिळत आहे. पुणे–मुंबई महामार्गावर हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रकचा प्रायोगिक प्रकल्प राबवला जात आहे.
गडकरी यांनी ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेत जैवइंधनाचा पैसा गेल्यास गावं स्मार्ट होऊ लागतात, असे सांगितले. नागरिकांना NHAI च्या रोख्यांवर 8.5 टक्के व्याज मिळणार असून, ते दरमहा खात्यात जमा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, देशातील 17 टक्के पडीक जमिनीवर बांबू लागवड केली पाहिजे, असे गडकरी यांनी सुचवले. बांबू कार्बन डायऑक्साइड शोषतो, त्याचे उष्मांक मूल्य कोळशापेक्षा जास्त आहे आणि त्यापासून इथेनॉल तयार करता येते. “भविष्यात उसाप्रमाणेच बांबूला देखील चांगला बाजारभाव मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. प्रमोद चौधरी यांनी शाश्वततेला प्राधान्य देऊन, जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी सर्व भागीदारांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.