माजलगाव :
माजलगाव धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा परिणाम धरणातील पाणी साठ्यावर होत असून, धरणाची पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी प्रशासनाने धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
शनिवार, दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजता माजलगाव प्रकल्पाच्या वक्रद्वार क्रमांक 6 आणि 16 हे प्रत्येकी 0.50 मीटरने वाढविण्यात आले. त्यामुळे सध्या धरणाच्या सांडव्यावरील एकूण तीन वक्रद्वार – क्रमांक 11, 6 व 16 हे अर्धा मीटरने उघडे ठेवण्यात आले असून, त्यातून सिंधफणा नदीपात्रात 5952.09 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
धरण क्षेत्रात सतत पाणी येत असल्याने आवक आणि जावक यावर लक्ष ठेवून पुढील विसर्ग कमी-जास्त करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रकल्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विसर्ग वाढल्यामुळे सिंधफणा आणि गोदावरी नदीकाठावरील तसेच पुराचा धोका निर्माण होणाऱ्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी नदीपात्राजवळ न जाता सुरक्षित स्थळी रहावे, असे आवाहन पूरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.