
मुंबई : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना, ऊस शेतीत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) मोठे परिवर्तन घडवून आणत आहे. पीक व्यवस्थापनातील अचूकता, वेळेवर निर्णय आणि संसाधनांची बचत यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन प्रचंड वाढत आहे. बारामती परिसरातील काही शेतकऱ्यांनी एआय-आधारित प्रणाली वापरून प्रति एकर तब्बल 100 ते 150 टन ऊस उत्पादन घेतल्याचा दावा केला असून या प्रयोगाने शेती क्षेत्राचे लक्ष वेधले आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
आजवर ऊस शेतीत अधिक उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात खत, पाणी आणि मजुरी खर्च केला जात होता, तरीही हवे तसे परिणाम मिळत नव्हते. पिकाची अचूक गरज काय आहे आणि कोणत्या क्षणी हस्तक्षेप करणे आवश्यक आहे, याची थेट माहिती नसल्याने उत्पादनात असमानता दिसत होती. पण एआयमुळे हे गणित बदलत असून शेती अधिक ‘स्मार्ट’ होत चालली आहे.
AI काम कसं करतं
उन्हाळा, मातीतील पोषण, ओलावा, तापमान, वारा, पावसाचे अंदाज… अशा अनेक घटकांचा एकत्रित डेटा एआय सतत विश्लेषित करतो.
जमिनीतल्या सेन्सरद्वारे मातीतील ओलाव्याची पातळी कळते.
पिकाला नेमकं कधी आणि किती पाणी द्यायचं याचा स्वयंचलित सल्ला मिळतो.
सॅटेलाइट मॅपिंगद्वारे ऊसाच्या वाढीचा वेग, आरोग्य आणि रोगांचा धोका यावर नजर ठेवली जाते.
मोबाईल अॅप शेतकऱ्यांना रोज अपडेट देत असल्यामुळे खत, पाणी आणि कीडनियंत्रण अचूक वेळी आणि योग्य प्रमाणात करता येते.
या तंत्रज्ञानामुळे ऊसाची वाढ समतोल राहते; कांड्यांचे वजन वाढते आणि एकंदर उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
उत्पादन वाढ आणि खर्चात बचत – दुहेरी फायदा
एआयचा वापर केल्याने केवळ उत्पादन वाढत नाही तर खर्चही मोठ्या प्रमाणात घटतो.
पाण्याची बचत : 30–35% पर्यंत
खतांचा वापर : 25–30% कमी
कीटकनाशक आणि मजुरीवरील खर्चातही घट
पिकाला आवश्यक तेवढेच पोषण दिल्याने जमिनीचा कस टिकून राहतो
मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढल्यामुळे भविष्यातील उत्पादन क्षमताही सुधारते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
शेती क्षेत्रासाठी ‘गेम-चेंजर’ मॉडेल
बारामतीतील पायलट प्रकल्पात एआयच्या वापरामुळे उत्पादनात तब्बल 40% वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा मॉडेल दुष्काळप्रवण भागांसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकतो कारण कमी पाण्यातही अधिक उत्पादन घेता येते.
शेतकऱ्यांसाठी एआय-आधारित शेती हे केवळ तंत्रज्ञान नाही तर टिकाऊ, नफा देणाऱ्या शेतीकडे नेणारे महत्त्वाचे पाऊल असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगतात.