Jayakwadi Dam : जायकवाडी धरणातून ६६ हजार २४ क्युसेक विसर्ग ; गोदावरी नदीकाठ च्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

छ. संभाजीनगर:
जायकवाडी धरण पैठण येथून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. शनिवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८.३० ते ९.०० या वेळेत जायकवाडी धरणातील १० ते २७ क्रमांकाचे एकूण १८ दरवाजे प्रत्येकी अर्धा फूट वर करण्यात येऊन आता हे दरवाजे ३.५ फूटांवर स्थिर ठेवले आहेत.

Amazon

Amazon App Player

Download Now

जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे अतिरिक्त ९४३२ क्युसेक पाणी हे गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे सांडव्याद्वारे होणारा एकूण विसर्ग ५६ हजार ५९२ क्युसेकवरून वाढून तब्बल ६६ हजार २४ क्युसेकपर्यंत गोदावरी नदी पात्रात विसर्ग होणार आहे

जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि पाण्याची वाढती आवक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथनगर (उत्तर), पैठण यांनी ही माहिती दिली आहे . येत्या काही तासांत आवक व पावसाच्या स्थितीनुसार विसर्गात आणखी वाढ कमी अथवा घट होऊ शकते, असेही जायकवाडी धरण प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, अचानक वाढलेल्या विसर्गामुळे गोदावरी नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.नदीकाठच्या वस्ती, शेतशिवार तसेच पूरग्रस्त भागाजवळील लोकांनी अनावश्यक धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now