बीड :
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात तब्बल २० महिन्यांपासून फरार असलेल्या अर्चना कुटे यांना अखेर सीआयडीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पुण्यातून त्यांना अटक करण्यात आली असून पुढील चौकशीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात येत आहे.

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
ज्ञानराधा मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. बीडसह महाराष्ट्रातील सुमारे ५२ शाखांतून हजारो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची रक्कम परत न मिळाल्याने ठेवीदारांनी आंदोलन छेडले होते. अखेर अध्यक्ष अर्चना कुटे, संचालक सुरेश कुटे व इतरांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले.
याप्रकरणी सुरेश कुटे, आशिष पाटोदकर आणि कुलकर्णी हे सध्या बीड जिल्हा कारागृहात आहेत. मात्र अर्चना कुटे गेल्या दोन वर्षांपासून फरार होत्या. या फरारीमुळे बीड पोलीस आणि तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
अर्चना कुटे यांनी ‘तिरुमला’ या नावाने अनेक ऑईल कंपन्या सुरू केल्याची माहितीही चौकशीत पुढे आली होती. द कुटे ग्रुपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप आहेत.
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदारांची आर्थिक व मानसिक होरपळ झाली. काही ठेवीदारांनी आत्महत्येचाही मार्ग निवडला होता. त्यामुळे अर्चना कुटे यांच्या अटकेची ठेवीदारांकडून सातत्याने मागणी होत होती.
आज (१६ सप्टेंबर) अखेर छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडी पथकाने अर्चना कुटे यांना पुण्यातून ताब्यात घेतले. या कारवाईनंतर ठेवीदारांमध्ये थोडा दिलासा निर्माण झाला असला तरी “आता तरी आमचे पैसे परत मिळणार का?” असा सवाल ठेवीदारांकडून केला जात आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, अर्चना कुटे यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.