पालम :
पालम शहरात रविवारी सायंकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बालाजी नगर परिसरात लोखंडी दांडी विजेच्या तारेला लागल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेचा क्रम
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी नगर येथील रहिवासी शेख शफीक शेख मुसा (31) यांची पान टपरी होती. रविवारी त्यांनी ही टपरी बैलगाडीतून घरी आणली. मात्र ती खाली घेत असताना दुर्दैवाने टपरी घसरली आणि बैलगाडीवरील लोखंडी दांडी थेट वीजेच्या तारेला स्पर्शली.
क्षणार्धात परिसरात मोठा आवाज झाला आणि जोराचा शॉर्टसर्किट झाला. यावेळी उपस्थित असलेले सिद्धार्थ नरहरी बावळे (35, रा. जवळा, ता. पालम), शेख शफीक शेख मुसा (31) आणि शेख शौकत शेख मुसा (40, रा. बालाजी नगर, पालम) या तिघांना विजेचा तीव्र धक्का बसला. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने पालम उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
जखमींची स्थिती
या घटनेत शेख फरहान शेख महेबूब (16), अशोक शेखेर शेख (18) आणि शेख असलम शेख गुड्डू (रा. आयेशा कॉलनी, पालम) हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या लोहा येथील साई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
शहरात शोककळा
या दुर्दैवी अपघातामुळे पालम शहरात वातावरण शोकाकुल झाले आहे. मृत्यू पावलेले तिघे हे परिसरात मेहनती व साध्या स्वभावाचे म्हणून ओळखले जात होते. एकाच कुटुंबातील दोन भावंडांचा यात मृत्यू झाल्याने बालाजी नगर परिसरात शोककळा पसरली आहे.
स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून, विद्युत विभागाकडून तातडीने वीज तारांची तपासणी करून सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.