Jayakwadi Dam जायकवाडी धरणाचे 12 दरवाजे उघडले ; 6388 क्युसेक पाण्याचा विसर्ग

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

छत्रपती संभाजीनगर :
गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने थोडी विश्रांती घेतली होती आणि धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक हे मंदावली होती मात्र शुक्रवारी (12 सप्टेंबर) पासून पावसाचा जोर वाढत असल्याने धरणात पुन्हा पाण्याची चांगली भर पडत आहे. दुपारपासून 7073 क्युसेक वेगाने पाणी धरणात होत असल्यामुळे वाढत्या पाणीसाठ्याचा ताण हा कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागाने 27 पैकी 12 दरवाजे हे अर्धा फूटाने उघडले आहेत. याद्वारे सध्या 6388 क्युसेक पाणी नियंत्रित पद्धतीने गोदावरी नदीच्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे

Amazon

Amazon App Player

Download Now

पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी धरणातील 18 दरवाजे बंद करण्यात आले होते. मात्र पावसाचा जोर पुन्हा वाढत असल्यामुळे आणि धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये देखील वाढ झाल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे गुरुवारी (11 सप्टेंबर) झालेल्या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात मोठी भर पडली आहे. परिणामी सध्या जायकवाडी धरण तब्बल 99 टक्के क्षमतेने भरलं आहे.

यंदाच्या मान्सूनमध्ये ही तिसरी वेळ आहे की धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पहिल्यांदा 31 जुलै रोजी दरवाजे उघडण्यात आलेले होते, त्यानंतर 21 ऑगस्ट रोजी दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले होते. या दोन्ही वेळच्या विसर्गातून मिळून 40 टीएमसी पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आलं होतं. आता, 12 सप्टेंबर रोजी तिसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

धरणातील पाणी सोडण्याचा निर्णय पूर्णपणे पावसाच्या पाण्याच्या आवकवर अवलंबून असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे पावसाचा जोर वाढल्यास विसर्गाचं प्रमाण वाढवलं जाईल, तर पाऊस कमी झाल्यास विसर्ग घटवला ही जाणार आहे.

मराठवाड्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने जायकवाडी धरणाचे महत्व प्रचंड आहे. त्यामुळे धरणातून नियंत्रित पद्धतीने होत असलेला विसर्ग हा परिसरातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now