बीड जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे माजलगाव धरण शंभर टक्के भरून अखेर शनिवारी (दि. ३० ऑगस्ट) दुपारी ओव्हरफ्लो झाल्या असून त्यामुळे प्रशासनाने धरणाचे तब्बल ९ दरवाजे उघडून १७ हजार ९८६ क्युसेक पाणी विसर्ग सुरू केला आहे. यामुळे सिंदफणा नदीसह परिसरातील लहान–मोठ्या पूर्ण भरून वाहत आहे

- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
जलाशय प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. शिवाय जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी माजलगाव धरणात येत असल्याने जलसाठा झपाट्याने वाढला. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी उशिरा रात्री जलाशयाचे तीन दरवाजे उघडण्यात आले होते. शनिवारी सकाळी आणखी सहा दरवाजे उघडले गेले, तर दुपारपर्यंत एकूण नऊ दरवाज्यांतून पाणी सोडण्यात आले.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्याची शक्यता
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे सिंदफणा नदीच्या काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण
माजलगाव धरण हे मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे जलाशय मानले जाते. बीड शहर, माजलगाव आणि आसपासच्या ११ गावांसाठी पाणीपुरवठ्याचा हा मुख्य स्त्रोत आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाणीटंचाईची चिंता कमी झाली असून शेतकऱ्यांनी दिलासा व्यक्त केला आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
जलाशय भरल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी मुसळधार पावसामुळे नद्या–नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे.
एकूणच, माजलगाव जलाशय ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने नागरिक आणि शेतकरी दोघांमध्येही मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने मात्र नदीकिनारी राहणाऱ्या गावकऱ्यांना सतत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.