
Jashpur News : जशपूर जिल्ह्यात रविवारी उशिरा रात्री झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर स्तब्ध झाला. पत्राटोलीजवळ, दुलदुला पोलिस स्टेशन हद्दीत, भरधाव वेगाने धावणारी कार अचानक समोरून येणाऱ्या ट्रेलरला धडकली आणि क्षणार्धात चक्काचूर झाली. या धडकेत कारमधील पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
कंट्रोल सुटले, अपघात टाळता आला नाही
मिळालेल्या माहितीनुसार, हे तरुण एका सांस्कृतिक कार्यक्रमावरून परतत होते. रात्री उशिराची वेळ, रस्ता ओसाड आणि घाईमुळे गाडीचा वेग वाढवण्यात आला. वळणावर समोर येणाऱ्या ट्रेलरला पाहून चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट ट्रेलरला जाऊन धडकली.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
धडक इतकी जबरदस्त होती की कारचे तुकडे तुकडे झाले. आसपासच्या ग्रामस्थांनी धाव घेतली, पण कारमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरला. पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळी पोलिस, क्रेन बोलावली
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. कार हटवण्यासाठी क्रेन बोलावावी लागली. मृतांची ओळख पटवून पोलिसांनी कुटुंबियांना कळवले. एकाच परिसरातील रहिवासी असलेल्या या तरुणांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.
वेग आणि अंधार – कारण एकच!
प्राथमिक तपासात कारचा अतिवेग आणि रात्रीच्या वेळी कमी दृश्यमानता हे कारण पुढे आले आहे. स्थानिकांनी सांगितले की, ज्या ठिकाणी अपघात झाला तो रस्ता आधीपासून धोकादायक असून येथे यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की प्रशासनाने या रस्त्यावर स्पीड ब्रेकर, इशारतीचे फलक आणि योग्य प्रकाशयोजना करावी.
तपास सुरू, परिसर शोकमग्न
ट्रेलर चालकाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दुलदुला पोलिस ठाण्याने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी मृत तरुणांना कॅंडल लाइटने श्रद्धांजली वाहिली. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, या अपघाताने पुन्हा एकदा वेगाच्या धोक्याची जाणीव करून दिली आहे.