तपोवनातील वृक्षतोड वादात नवी कलाटणी!

नाशिक | कुंभमेळा 2027 च्या तयारीत महापालिकेने तपोवन परिसरातील काही झाडे तोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभर पर्यावरणप्रेमी आणि विविध संघटनांकडून तीव्र विरोध सुरू आहे. ‘एकही झाड तोडू देणार नाही’ अशा भूमिकेत पर्यावरण कार्यकर्त्यांसोबत आता हिंदू संघटनाही उतरल्या आहेत. फूली मारण्यात आलेली झाडे वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्या झाडांवर “जय श्रीराम”, “जय हनुमान” अशी अक्षरे लिहित शेंदूर लावून त्यांचेही ‘संवर्धन आंदोलन’ सुरू केले आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
दरम्यान, या प्रश्नावरचे वातावरण तापले असतानाच आंदोलनाला प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाठिंबा जाहीर केला. “तपोवनातील झाडांना कुणी हात लावू देणार नाही,” असे म्हणत त्यांनी संत-महंतांबद्दल काही वादग्रस्त टिप्पणी केल्याने नवा वाद निर्माण झाला।
यावर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिंदेंवर थेट हल्ला चढवला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेचे नवे वळण तयार झाले आहे.
सदावर्तेंचा सयाजी शिंदेंवर जोरदार प्रहार
पत्रकारांशी बोलताना सदावर्ते म्हणाले—
“तपोवन हे साधू-संतांसाठी असलेले स्थान आहे. एक कलाकार म्हणून यामध्ये अडथळा निर्माण करणे योग्य नाही. असे आले किती आणि गेले किती… सयाजी शिंदे यांनी चिंतन करावे. केवळ स्क्रिप्ट वाचू नये, जास्त टर-टर करू नये. स्क्रिप्टवर जगणं सोडा, कुणाचं तरी ऐकून जगणं सोडा.”
त्यांच्या या वक्तव्याने राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गिरीश महाजन यांचे कौतुक
सदावर्ते यांनी यावेळी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचंही समर्थन केलं.
“गिरीश महाजनांची गॅरंटी आहे—एकही झाड तुटणार नाही,” असे ते म्हणाले.
सरकार आणि पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात सदावर्ते हे नवीन ‘फ्रंटवर’ उतरल्याने तपोवनातील वृक्षतोड प्रकरण अधिकच गाजू लागले आहे.
आता पुढे काय?
पर्यावरणप्रेमी, हिंदू संघटना, स्थानिक नागरिक, अभिनेते आणि आता नामांकित वकील—सगळेच या मुद्द्यावर सक्रिय झाल्यामुळे तपोवनातील झाडांच्या भवितव्याबद्दलचा संघर्ष अजून तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेचा निर्णय कायम राहणार की जनआंदोलनाचा दबाव वाढणार? याकडे आता साऱ्यांचे लक्ष आहे.