
मुंबई: वरळी परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नी, डॉक्टर गौरी पालवे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या या नववधूचा मृत्यू नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत सध्या विविध शक्यता आणि आरोपांची चर्चा सुरू आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
१० महिन्यांच्या संसाराचा अंत
अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी यांचा विवाह यावर्षी ७ फेब्रुवारीला मोठ्या थाटामाटात झाला होता. या सोहळ्याला पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र अवघ्या दहा महिन्यांत या वैवाहिक जीवनाला दुर्दैवी पूर्णविराम मिळाला.
कौटुंबिक वाद? वेगवेगळे दावे समोर येत आहेत
प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. तर काही माध्यमात्मक माहितीनुसार, मानसिक तणावात होती, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तसंच सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याचाही आरोप गौरी यांच्या माहेरच्यांकडून करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी या सर्व दाव्यांची पडताळणी सुरू केली आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
घटना कशी उघडकीस आली?
शनिवारी संध्याकाळी सुमारास गौरी यांनी वरळी बीडीडी कॉलनीतील घरात गळफास घेतल्याचे समजते. खबर मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून चौकशी सुरू आहे.
राजकीय वर्तुळात हळहळ
घटनेची माहिती मिळताच पंकजा मुंडेंनी बीडमधील आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. विवाहाच्या काही महिन्यांतच अशा प्रकारचा शेवट झाल्याने सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
पोलिसांचा तपास सुरु
वरळी पोलिसांकडून कुटुंबीयांचे जबाब घेतले जात असून, सर्व शक्य कोनातून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूमागील कारणाचे अधिक स्पष्ट चित्र समोर येईल.
या घटनेनं एक तरुण डॉक्टर, एक नववधू, आणि एका परिवाराच्या जीवनाला कायमचा वेदनादायी वळण मिळालं आहे. आता या मृत्यूमागील सत्य नेमकं कोणतं, हे तपासच उघड करणार आहे.