अपूर्ण ई-KYCमुळे उर्वरित रक्कम रोखली — तातडीने KYC पूर्ण करण्याचे तहसीलदार डॉ. नाईक यांचे आवाहन

Spread the love
तहसीलदार डॉ. उद्धव नाईक
Verification: 1fe30fb203b45d5d

पाथर्डी | अतिवृष्टी व रब्बी हंगामातील पिकनुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेल्या ₹185 कोटींच्या अनुदानापैकी 70 टक्के रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. मात्र शेकडो शेतकऱ्यांची रक्कम अद्यापही थांबून असून यामागे ई-KYC अपूर्णता, फार्मर आयडी नोंदणीतील त्रुटी आणि आधार सीडिंगमधील तांत्रिक अडचणी कारणीभूत असल्याचे तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी सांगितले.

Amazon

Amazon App Player

Download Now

तहसील प्रशासनाने तातडीचे आवाहन करताना म्हटले आहे की, अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांनी सेतू केंद्रात जाऊन अंगठा प्रमाणीकरणाद्वारे ‘ई-KYC’ त्वरित पूर्ण करावी.

डॉ. नाईक म्हणाले, “ई-KYC पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची थांबलेली रक्कम तात्काळ जमा केली जाईल. कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही,” अशी खात्री प्रशासनाने दिली आहे.

ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी यांना देखील गावागावांत शेतकऱ्यांना याबाबत माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तहसील कार्यालयाने विशेष पथकांकडून देखरेख सुरू केली आहे.

शेतकऱ्यांनी विलंब न करता ई-KYC पूर्ण करणे अत्यावश्यक असून अनुदान रक्कम रोखली जाऊ नये यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now