
सांगली | राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ साठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून साखराळे, वाटेगाव–सुरूल व कारंदवाडी या तिन्ही युनिटकडे गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३५०० रुपये दर जाहीर केला आहे. हा दर निश्चित करताना कारखान्याने साखर उद्योगातील सद्यस्थिती, केंद्र सरकारच्या शक्य तितक्या आगामी निर्णयांची अपेक्षा आणि गतवर्षीचा साखरेचा वाढलेला उतारा यांचा विचार केला असल्याची माहिती कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी दिली.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
माहुली यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, “राजारामबापू कारखान्यावर शेतकऱ्यांनी नेहमीचा विश्वास ठेवावा. आपला ऊस वेळेवर कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे.”
गेला गळीत हंगाम ऊसाच्या टंचाईमुळे अवघ्या १०० दिवसांत संपल्याने कारखान्यापुढे काही आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. केंद्र सरकार लवकरच साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करेल अशी अपेक्षा आहे.
तसेच, गेल्या तीन वर्षांत इथेनॉलचे दर वाढले नसल्याने त्यातही एफआरपीप्रमाणे सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
ऊसदर जाहीर करताना विचार केलेले प्रमुख घटक
साखरेचा उतारा यावर्षी गतवर्षीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज
केंद्र सरकारकडून साखर दरवाढ आणि इथेनॉल दरवाढीची अपेक्षा
कारखान्याची आर्थिक स्थिरता आणि शेतकऱ्यांचे हित
या सर्वांचा विचार करूनच ३५०० रुपये प्रतिटन असा दर निश्चित केल्याचे कारखान्याने स्पष्ट केले.
राजारामबापू कारखान्याची परंपरा कायम
गेल्या ५०-५५ वर्षांच्या कामगिरीत राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने नेहमीच उच्चांकी दराची परंपरा राखली आहे. शेतकरी आणि साखर कामगारांच्या हिताला प्राधान्य देत कारखान्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळवले आहेत.
शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढावे यासाठी कारखाना
आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी
क्षारपड जमीन सुधारणा योजना
ठिबक सिंचन
कुसुमताई प्रोत्साहन योजना
यांसारख्या उपयुक्त योजना राबवत आहे. या योजनांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे माहुली यांनी नमूद केले.
राजारामबापू साखर कारखान्याने जाहीर केलेल्या नव्या दरामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाची भावना असून आगामी हंगामाबाबत आशावादही वाढला आहे.