मतदारांपासून पक्षापर्यंतची ‘अंतर्गत कहाणी’

बिहारचे निकाल जाहीर झाले, तेव्हा दिल्लीतील काँग्रेस काही प्रमाणामध्ये निराशा ही बघायला मिळाली मतमोजणीच्या प्रत्येक फेरीसोबत पक्षाच्या आकड्यांचा उतार होत गेला व एनडीए 200 च्या पुढे जात होते, तर महागठबंधनचे निकालामुळे सर्वांचेच चेहरे उतरले होते. 60 जागांवर उमेदवार उभे करूनही फक्त सहा जागा मिळाल्या — गेल्या दोन दशकांमधील सर्वाधिक कमी आकडा हा या वेळ गाठला होता.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
पण या निकालामागची खरी गोष्ट निवडणुकीच्या दिवशी सुरू झालेली . बिहार मधील प्रत्येक जिल्ह्यात, गावात, याची चिन्हं काही महिन्यांपासून दिसत होती. म्हणूनच तज्ज्ञ असे म्हणतात — “हा पराभव अचानक नाही, फक्त उघड झालेली वास्तविकता आहे सांगतो आहे .”
१) काँग्रेसचा सामाजिक पाया — जिथे सुरू झाला संथ पण ठळक घसरणीचा प्रवास
पटण्याच्या रमकल चौकात चहाच्या दुकानात चर्चा रंगलेली. एक बुजुर्ग जेएनयूचे माजी विद्यार्थी सांगत होते,
“काँग्रेसकडे आपला ठरावीक वर्ग राहिलाच नाही. उच्चवर्णीय तर गेलेच मात्र इतरही काँग्रेस सोबत राहिलेले नाही त्यामुळेच ही पराभवाची सुरुवात झाली.
हे खरंच.
दलित आणि ओबीसी समाजाला आकर्षित करण्यासाठी राहुल गांधींनी जाहीर केलेलं ‘संकल्प पत्र’ गावोगाव पोहोचायला हवं होतं. पण ते कागदांच्या बंडलातच अडकलं. प्रचारात त्याचा उल्लेखही फारसा कुठे काही दिसला नाही
या दरम्यान, भाजप-जेडीयूची जातीनिहाय रचना मात्र गावांमध्ये खोलवर पोहोचलेली. तिथे काँग्रेसची फटफटती दिवटी नगण्य वाटत होती.
२) वैचारिक युद्धात काँग्रेस गायब — होते तर एनडीएनं भावना हातात घेतल्या
निवडणुकीत मधे थोडा वेगळा संदेश दिला की भाजपनं ‘जंगलराज विरुद्ध सुशासन’ असा तिरकस पण सोपा संदेश त्यामुळे देखील निवडणुकीला कलाटणी मिळाल्याचे बोलले जात आहे
तर काँग्रेस ‘विचारसरणी’, ‘सामाजिक न्याय’, ‘संविधानाच्या रक्षा’सारख्या मोठ्या संकल्पनांवर बोलत राहिली.
चांदखेडा गावातील एका तरुणानं सांगितलं,
“आम्हाला नोकरी लागावी, सुरक्षित रस्ता असावा — बस. मोठ्या मोठ्या विचारांच्या भाषणांनी पोट भरत नाही.” आम्हाला हाताला काम हवंय
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
सुरूर अहमद म्हणतात,
“सोशल मीडियानं मतदान भावनिक केलं आहे. काँग्रेसकडे भावनिक जोड नाही.” आता कसल्याही प्रकारचा राहिलेला नाही त्यामुळेच भाजपने चांगली संधी मिळताच डाव साधला

३) नरेटिव्हची लढाई — काँग्रेस मुद्दे घेऊन आली पण लोकांची भाषा त्यांना समजली नाही
महागठबंधननं बेरोजगारी, महागाई, शिक्षण-आरोग्य यांचा जाहीरनाम्यात उल्लेख केला.
पण प्रचारसभांमध्ये काँग्रेस नेते ‘मत चोरी’, ‘बनावट ईव्हीएम’, ‘फर्जी यादी’ यावर बोलू लागले.
मतदार मतदानाच्या एक दिवस आधी उत्साहात उभा असताना त्याला सांगितलं—
“तुमचं मत चोरीला जातंय.”
हे त्याला अजिबात पटलं नाही.
त्याचवेळी एनडीएनं लालूंच्या काळातील ‘जंगलराज’ची आठवण पुन्हा जिवंत केली.
आणि मतदार जिथे भीती व भावनांनी ढळतात, तिथे काँग्रेसचे आकडे शांतपणे खाली येत राहिले.
राजद आणि काँग्रेसमध्ये नेहमीची सावलीसारखी असलेली अविश्वासाची रेषा यावेळी फार जास्त दिसली.
जागावाटपात कुरघोड्या, संयुक्त सभा घेण्यावरून वाद…
अखेरीस पत्रकार परिषदेमध्ये “सगळं ठीक आहे” असं दाखवावं लागलं; पण जमिनीवर मात्र कार्यकर्ते गोंधळात.
अजय कुमार स्पष्ट म्हणतात,
“जर स्वतःची संघटना कमकुवत असेल आणि आघाडीलाही सांभाळता येत नसेल, तर निकाल वेगळा कसा येणार?”
५) उमेदवार निवड — काँग्रेसची सर्वात मोठी दुखरी जागा
बिहारमध्ये आजही निवडणुका ‘लोकल ओळख’ आणि ‘जमिनीवरील प्रभाव’ यावर ठरतात.
परंतु काँग्रेसनं अनेक ठिकाणी बाहेरून आणलेले किंवा कमी ओळख असलेले उमेदवार उभे केले.
नचिकेता नारायण म्हणतात,
“राजदकडे जमीनीवर संघटना आहे, काँग्रेसकडे नाही. लोकल नेता जितका मजबूत, तितकंच मत निश्चित.”
म्हणूनच अनेक काँग्रेस उमेदवारांचे प्रचार कार्यालये मतदानाआधीचे तीन दिवस जवळपास रिकामे दिसत होते.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
पराभव निवडणुकीचा नाही, दशकांतील सैलपणाचा आहे
या निवडणुकीनं काँग्रेसला दोन स्पष्ट संदेश दिले —
सामाजिक आधाराशिवाय राजकारण नाही, आणि
भावना आणि नरेटिव्हशिवाय विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचत नाही.
एनडीएच्या लाटेत काँग्रेस गडप झाली असं नाही; ती स्वतःच खोल पाण्यात उतरली आणि काठ गाठण्यापूर्वीच थकून गेली — असा तिखट निष्कर्ष अनेक तज्ज्ञांनी काढला आहे.
आता काँग्रेससाठी खरी परीक्षा सुरू होते —
ही धुळ हलवून संघटना उभारणार की पुढच्या निवडणुकीतही ‘दहामागे एक’ अशा आकड्यांवरच थांबणार?