Majalgaon Dam:माजलगाव धरणातून आज 11 वाजता 1 लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

माजलगाव :
माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रा मध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार जिल्हा मध्ये धुमाकुळ घातला आहे . त्यामुळे धरणातील मधील पाणीपातळी ही झपाट्याने वाढत असल्यामुळे, धरण प्रशासनाने पाणी विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Amazon

Amazon App Player

Download Now

आज दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून माजलगाव धरणातून १ लाख क्यूसेक पाणी सिंधफणा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सिंधफणा व पुढे गोदावरी नदीच्या पात्रातील पाणीपातळीत अचानक ही वाढ होणार आहे.
त्यामुळे

धरण प्रशासन व स्थानिक प्रशासनाने याबाबत परिसरातील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठावरील गावांनी विशेष खबरदारी घेण्याचे देखील प्रशासनाने आवाहन केले आहे. त्याचबरोबर नदीपात्रात कोणीही न जाण्याची सूचना देण्यात आलेली आहे.

नदीकाठच्या गावातील
गावकऱ्यांनी आपल्या घरातील जनावरे, धान्य व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, पुलावरून जाण्यास टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी प्रशासनाकडून आपत्कालीन पथके तयार ठेवण्यात आली असून, आपत्ती व्यवस्थापन विभाग देखील सज्ज असल्याचे कळते.

नदीकाठावरील सर्व नागरिकांनी सावधान राहा व सुरक्षिततेची काळजी घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now