Majalgaon Dam: माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला; जुन्या पुलावरून वाहू लागलं पाणी

Spread the love
Verification: 1fe30fb203b45d5d

बीड :
माजलगाव धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढतच चाललेली असल्यामुळे धरम प्रशासनाने पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलेला आहे त्यामुळेच सिंदफणा नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे . या वाढत्या पाणलोटामुळे सिंदफणा नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे, प्रशासनाने नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे

Amazon

Amazon App Player

Download Now

सद्यस्थितीमध्ये धरणातून सकाळपासून सतत विसर्ग सुरू असून, नदीकाठावरील गावांमध्ये नागरिकांनी अनावश्यक हालचाली असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. जुन्या पुलावरून नदीचे पाणी वाहत असल्यामुळे या पुलावर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे पोलिस आणि महसूल प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, पावसामुळे धरणक्षेत्रात पाणी साठा वेगाने वाढत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक तो विसर्ग सुरू ठेवला जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असं आवाहन प्रशासनाने केलेले आहे

स्थानिकांनाही धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. दरवर्षी पावसाळ्यात असा प्रकार घडत असला तरी पुलावरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, या वेळी सुरक्षित अंतर ठेवण्याच्या प्रशासनाने सूचना केलेल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Amazon

Amazon App Player

Download Now