
Nagpur Sesstion : हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच राज्याच्या राजकारणाला अक्षरशः धक्का बसला आहे. इंडिगोच्या सतत चालू असलेल्या फ्लाईट गोंधळाने यावेळी थेट विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम केला आहे. नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या डझनभर आमदारांची विमान तिकिटं अचानक रद्द झाली असून, प्रवासाची नवी ड headache निर्माण झाली आहे.
- Brain drain : भारतासमोरील वाढती बौद्धिक गळती
- IND vs PAK : 18व्या षटकातील ‘त्या’ कॅचनंतर टीम इंडियात तणाव? हार्दिक-कुलदीप वादाचा व्हिडीओ व्हायरल
- मोठी बातमी : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार? १९९० ते २०२५ दरम्यानच्या कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; १४ जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा
- युपीआयद्वारे काढता येणार पीएफची रक्कम, कशी आणि कधी; जाणून घ्या
- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ६ मार्चला; विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून, मुख्यमंत्री फडणवीस मांडणार बजेट
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई विभागातील अनेक महत्त्वाच्या आमदारांनी दुपारच्या फ्लाईटने नागपूर गाठण्याची तयारी केली होती. काहींनी कुटुंबासह प्रवासाचे नियोजन केले होते. पण, विमान सेवा कोसळल्याने सगळं गणित कोलमडलं. तिकिटं रद्द होताच अनेक आमदार महामार्गावर निघाले. स्वतःच्या मोटारींनी नागपूर गाठण्याची ही धावपळ राजकारणात विरळाच पाहायला मिळते.
दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई विमानतळांवरील परिस्थिती तर अधिकच बिकट आहे. भीषण गर्दी, डिले आणि फ्लाईट रद्द यांच्या तगड्या संगमात सामान्य प्रवासी तर त्रस्त आहेतच, पण आमदार-मंत्रीही अक्षरशः सापडून गेले आहेत.
सततच्या या गोंधळात मागील चार दिवसांत एकूण 2,000 हून अधिक फ्लाईट्स रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. अंदाजे 3 लाखांहून अधिक प्रवाशांना, त्यात मंत्री-आमदारांचाही समावेश, मोठा फटका बसला आहे.
उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावरही या विमान सेवेतल्या बेजबाबदार परिस्थितीचा परिणाम होण्याची चिन्हं दिसत आहेत. महत्त्वाची विधेयकं, चर्चा आणि मंत्रिमंडळाची उपस्थिती यावर ‘फ्लाईट संकटाचं’ सावट आहे.
अखेर, अधिवेशनापूर्वीचा हा गोंधळ केवळ प्रवासाचा नाही; तर प्रशासन, व्यवस्थापन आणि नियोजनातील त्रुटींचा आरसा ठरत आहे. आता उद्यापासूनच्या अधिवेशनात कोण-कसे पोहोचतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.